ग्रामपंचायत निवडणूका महासंग्राम नक्की कोण कोणासोबत..??
नवी मुंबई : महाराष्ट्रात रविवारी झालेल्या 547 ग्रामपंचायत निवडणूक मतदानानंतर आज निकालाचे आकडे समोर येत आहेत . 608 ग्रामपंचायतीमधील काही ठिकाणचे निकाल समोर आले असून त्यामध्ये भाजपची सरसी असल्याचे दिसत आहे . ग्रामपंचायत निवडणूक राजकीय चिन्हावर लढवली जात नसली तरी राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते . - 608 ग्रामपंचायतींपैकी 495 ठिकाणचे निकाल समोर आले आहेत . त्यामध्ये भाजप - 143 , राष्ट्रवादी - 127 , काँग्रेस 59 , शिंदे गट -41 , शिवसेना -37 आणि इतर - 88 अशी आकडेवारी समोर आली आहे . भाजप + शिंदे गट- 184 तर महाविकास आघाडीला 223 ठिकाणी विजय मिळाला आहे. भाजपने सर्वाधिक 143 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे . दरम्यान , अद्यापही काही ग्रामपंचायतींचा निकाल येणे बाकी आहे . विजयी उमेदवारांचा जल्लोष सर्वत्र पाहायला मिळत आहे . माहिती अपडेट होत आहे .